Posts

Showing posts from July, 2023

भुत एक अनुभव....

 भुत एक अनुभव ही खरी घडलेली कथा आहे माझ्या आजोबांच्या बाबतीत, अंदाजे 1934-1935 सालाची गावाकडे पूर्वी लाईट नसलेने माणसे कंदिल वापरत असत व गावाकडे घड्याळ पण नसलेत जमा  आणि झाडे ही खुप होती म्हणजे दिवसा जाणं भितीदायक  अशाच हिवाळयाच्या दिवसातला अनुभव आजोबांचा, गाव जे आहे ते चहु बाजूने डोंगर झाडे वनराईन नटलेले  अशा एका दिवशी आजोबांना त्याच्या आईने बैल चारायला उद्या धामना (डोंगराच नाव आहे) तेथे घेऊन जा त्यावेळी बॅटरी नसलेने कंदिल वापरत मग आजोबा तरूण होते 17- 18 वयाचे  मग पहाटे पहाटे जाऊ अस वाटल म्हणून कोंबड आरवल की जाऊ पण त्या दिवशी 2.30 ते 3 वाजता कोंबड। आरवलाचा आवाज झाला आजोबाना वाटल पहाट झाली ते बैलाला घेऊन निघाले गावाची वेस ओलांडलावर गावाच्या स्मशानभूमीकडे वाटेवर आजोबांना एक पांढरे कपडे घातलेला माणूस दिसला आजोबाना वाटल बर झाल सोबतीला भेटल म्हणून आजोबा त्याला आवाज देऊ लागले आर थांब की मला पण येऊ दे जाऊ सोबत तो माणूस थांबेना अस तीन चार वेळा झाल आजोबाच्या हातात बैलाचा दोर होता आवाज आजोबांनी मारले किवा कीती जोरात चालले तरी माणूस आणि आजोबा अंतर कमी होत नवतं मगu आजोबाना...

केळशी ट्रीप

 ११ मे २०२० भल्या पहाटे उठून माझ्या मित्राचा फोन खणाणला गुरुवारी आपल्याला केळशीला मयूर कडे जायचे झालं म्हणलं की कोकण आणि कोकण म्हटलं की तिथला समुद्र मासे मनाला भारावून टाकणारे आल्हाददायक वातावरण या सगळ्यांमुळे मला खूपच आनंद होतो सकाळी आठ वाजता माझा मित्र रवी पवार आला सकाळच्या थंड मस्त होती हवेत थोडा गारवा होता मग रवी गाडीला स्टार्टर मारला आणि आम्ही केळशी कडे कूच केली सकाळचे आल्हाददायक वातावरण मनाला भावून टाकणारी थंडी खूपच छान होती मन अगदी प्रसन्न होत होतं, पाचगणी महाबळेश्वर करत करत आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत आंबेनळी घाटातून डोंगर-दऱ्या तिथून पक्ष्यांचे विविध आवाज मनाला मोहून टाकणारा निसर्ग,मधेच दिमाखात आणि तितक्याच तोऱ्यात उभा असणारा प्रतापगड सुद्धा मला दिसला भगवा सुद्धा तेवढ्याच दिमाखात फडकत होता, शिवछत्रपतींना वंदन करत,  आम्ही पोलादपूरला पोचलो तेथे मग आम्ही एका हॉटेलमध्ये चहा घेतला चहा एवढा अप्रतिम होता की आम्हाला खूप आवडला दोनदा चहा पिला मग रवींद्र जाणून घेण्याचा प्रयत्न केला चहा वाल्याकडून कसा करता चहा वगैरे वगैरे या वस्तू चहावाला रवीला म्हणाला साहेब चहा पत्ती कोणतीही असो ...

प्रतापगड दर्शन सहल

 प्रतापगड दर्शन सहल दि. 17 नोव्हेंबर 2020 भाऊबीज झाल्यानंतर आमच्या अपार्टमेंटमधील भटकी भटकंती करणारे आमचे मित्र म्हणजे महेश सुशांत राहुल ओमकार सूर्या भाई ओमकार आणि सागर सर्वांनी प्लांन ठरवला ही 17 तारखेला प्रतापगडला जायचं       17 नोव्हेंबरला भल्या पहाटे सकाळी नऊ वाजता आम्ही वाई वरून प्रतापगड कडे कूच केली सर्वांनी आम्ही टू व्हीलर घेतल्या होत्या पाचगणी आणि मग महाबळेश्वर चे सह्याद्रीचे उंचच्या उंच कडे आणि खोल दऱ्या मन अगदी मोहून टाकत होत्या. हा घाट म्हणजे आंबेनळी चा घाट हा घाट उतरल्यावर आम्ही खाली एका हॉटेल जवळ नाष्ट्यासाठी थांबलो मग आम्ही प्रतापगडाकडे रवाना झालो सह्याद्रीचे उंच कडे खोल दऱ्या आणि समोरच उभा असलेला अगदी दिमाखात किल्ले प्रतापगड *वाई वरून मार्ग:-* वाई👉 पाचगणी 👉महाबळेश्वर👉 वाडा कुंभरोशी👉 प्रतापगड *किल्ले प्रतापगडा बद्दल माहिती*:- या डोंगराला पूर्वी "ढोरप्याचा डोंगर" असे संबोधले जायचे ढोर म्हणजे गुरे तिथले स्थानिक लोक या डोंगराचा गुरे चारण्यासाठी वापर करत असत.     सुरूवातीला हा किल्ला जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता चंद्रराव मोरे म...

आठवणीतील विसापूर...

     Msc 1 मधे  आकूर्डीमधे शिकायला असताना दि 11/1/2011 रोजी मी आणि माझे मिञ शेखर, गोरख, महादेव, गणेश, वर्षा, मोहिनी संजिवनी चैताली असे सर्वांच विसापूर किल्लावर जायचं अस नक्की झालं.     ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी 8.30 वा. आकूर्डी रेल्वेस्टेशनवर जमलो 9.30 ची लोणावळा लोकल पकडून 10 वाजता मळवली इथ पोचलो, काय सुंदर वातावरण होत सकाळचं धुंक त्यात थोडी थंडी आणि रोडवर जास्त रहदारी नव्हती. गप्पा  गोष्टी मजा करत आम्ही एक हाॅटेलजवळ पोचलो तेथे छान काॅफीचा आनंद घेत आम्ही विसापूरची वाट पकडली.   डोंगरातली ती वळणावळणाची वाट किती अवघड पण तीही खुप छान वाटत होती सगळीकडे धरणीने हिरवी शाल पांघरली की काय अस वाटत होत डोंगरातुन येणार खळखळणारे झ-याच पाणी पिऊन आम्ही किल्ला सर करत होतो, जस जस वर वर जाव तस गांव, माणसं छोटी वाटत होती रेल्वे तर अगदी खेळण्यातली वाटत होती. थोडा आराम मजा करत अखेर आम्ही विसापूर वर पोचलो त्यावेळचं वातावरण सुंदर होतं. महादेव मधुन मधुन गोरख च्या मोबाईल मधून फोटो काढत होता.    खरच खुप रोमांच अंगात भरत होता, किल्ल्याची ती अभेद्य तटबंदी पाहून आठव...

केंजळ गावातील बालपणीचे दिवस....

 केंजळ गावातील बालपणीचे दिवस.... माझ गाव तस विदर्भातलं अमरावती पण आईच्या नोकरी निमित्त केंजळ ला आलो माझा जन्म पण केंजळचा, व्यक्ती किती मोठा झाला तरी तो आपल्या बालपणीचे दिवस, ते सवंगडी विसरुं शकत नाही.        केंजळ गाव तस सुंदर चारही बाजूने हिरव्या गार वनराईन नटलेलं, जस जस समजायला कळत झाल्यावर बालवाडीत नाव टाकलं त्यावेळी बालवाडी महालक्ष्मीच्या देवळात भरायची, माझ्या आवडीच्या शिक्षिका बागल बाई खूप लाड करायच्या, इथेच पहिला श्री गणेशाने सुरवात झाली नविन मिञ भेटले स्वप्निल , जयंत , योगेश सागर मजा येयची, बालवाडीत गाणी, खेळ आई माझ पञ हरवल , पकडा पडकी असे खेळ आम्ही रहायला जगताप बंधू च्या घरी  तिथे सर्वांनी छान संभाळून घेतल अशोक काका मला नांगरावर बसायला नेयचे कधी मी मागं लागायचो नांगरावर मजा येयची माती कशी भुसभुशीत होयची कधी बैल ( सुंदर, नाजूक) जोरात शेपुट मारायचे तोंडावर तोंड चांगलं शेकून निघायचं पण कूळवावर बसायची मजा औरचं, पावसाळ्यात खुप मजा यायची घर रानात असल्याने पाऊस मनासारखा अनुभवता आला गारा वेचून खाल्या, घरामागे तिन आंब्याची झाडे आहेत खुप आंबे पाड...